पात्रता निकष

कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही?

पात्रता (Eligibility)

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता (Ineligible)

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
  • शासनाच्या इतर आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असलेल्या महिला.
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार असल्यास.
  • कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड/कॉर्पोरेशनचे अध्यक्ष/संचालक असल्यास.
  • कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास.

पुढील पाऊल काय?

जर तुम्ही पात्र असाल, तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे तपासा.

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट